आजच्या काळात स्मार्ट राहण्यासाठी नक्की करायचं काय?
आजच्या बदलत्या आणि धावत्या काळात स्वतःचा टिकाव लागण्यासाठी स्मार्ट असणं आवश्यक आहे असं आपण अनेकदा ऐकतो. पण नेमकं स्मार्ट असणं म्हणजे काय यातच अनेकांचा गोंधळ होतो. म्हणूनच या लेखात आपण स्मार्टनेसबद्दल आणि स्मार्ट असणाऱ्यामध्ये नेमकं काय वेगळेपण असतं याबद्दल जाणून घेणार आहोत.
१. परिस्थितीविषयक जागरूकता
आव्हानात्मक परिस्थितीत जर आपणच घाबरुन जात असू तर परिस्थितीचा सामना करणं शक्य होणार नाही. त्याचे आणखीन विचित्र काही परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे स्मार्ट व्हायचं असेल तर परिस्थितीविषयी जागरुकता असणं अत्यंत गरजेचं आहे.
२. गरज असल्यास माहितीमध्ये बदल करणे
अनेकदा आयुष्यात काहीतरी न आवडणारं घडतं. एखादा आपल्याकडे काहीतरी बोललेला असतो ते दुसऱ्याला समजलं तर वाद निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याकडे असलेल्या माहितीत गरजेनुसार बदल करणं अतिशय गरजेचं आहे.
३. समस्या निवारण
समस्या आली म्हणून त्यावर रडत न बसता लवकरात लवकर त्यावर उपाय शोधण्यास आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ही सवय आपल्याला आयुष्यभरासाठी अतिशय मदतीची ठरेल. समस्यांपासून पळण्यापेक्षा त्या सोडवण्यावर, मार्गी लावण्यावर भर देणं आपल्या व्यक्तिमत्वात स्मार्टनेस आणेल.
४. ध्येयाबाबत स्पष्टता
आपली आवड नक्की कशात आहे, जे ध्येय आपण ठरवलं आहे ते पूर्ण करण्याची क्षमता, मेहनत घेण्याची तयारी आपली आहे का या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे.
जेणे करुन आपल्यावर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. शिवाय, योग्य नियोजनाने ध्येय ठरवून पूर्ण करणं यातून आपला स्मार्टनेस दिसतो.
५. इतरांबद्दल सहानुभूती आणि दया
आपण खूप स्मार्ट आहोत, आपल्या सगळ्या कामांमध्ये चोख आहोत म्हणून इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न कधीही करु नये. अशी माणसं इतरांना स्मार्ट नाही तर अहंकारी वाटत असतात. अहंकारी माणसाने आयुष्यात कितीही चांगलं यश मिळवलं तरी कोणीही त्याकडे सन्मानाने पाहणार नाही.
६. निर्णयक्षमता
त्यामुळे योग्य वेळेत योग्य गोष्टी ते घडवून आणत असतात. यामध्ये प्रत्येकवेळी निर्णय बरोबरच येतील असं नाही पण निर्णय चुकीचे ठरले तर ते स्वीकारण्याची जबाबदारीदेखील ते घेत असतात. हाच स्मार्टनेस प्रत्येक माणसात असणं गरजेचं आहे.