शाहीर अमर शेख ह्यांनी लिहिलेला शिवरायांचा पोवाडा…
शाहीर अमर शेख म्हणजे मराठमोळ्या डफावरची मराठमोळी थाप. तुणतुण्याचा ताण नि पहाडी आवाज. धर्म माणसासाठी असतो माणसं धर्मासाठी नसतात हे तत्व पाळून त्यांनी हाडाचा मराठी बाणा सांभाळला.
‘सुटला वादळी वारा’ सारखे गीत लिहिणारे नि संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान दिल्लीच्या रस्त्यारस्त्यावर डफावर थाप मारत पोवाडे गाणारे शाहीर अमर शेख अत्यंत वंदनीय आहेत.
शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्या कविता व पोवाडे अमर शेख ह्यांनीच सादर केले होते. आजच्या लेखात अमर शेख ह्यांनी शिवरायांवर लिहिलेला पोवाडा आपण पाहणार आहोत. तसा हा पोवाडा मोठा आहे पण नेमके त्यांना काय म्हणायचे होते, त्यांनी केलेले वर्णन कसे आहे सारे पाहुयात.
हे वर्णन शिवरायांच्या जन्मापूर्वीचे वातावरण स्पष्ट करते. सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा प्रकाश कसा आला अशी कल्पना करत शाहीर म्हणतात, हे मानवाला उमगलेच नाही. ते केवळ सह्याद्रीला माहिती होते म्हणून तो आनंदाने हसत होता.
चिमण्यांचा थवा कसा गात उठला असे म्हणत सकाळचे वातावरण अमर शेख निर्माण करतात आणि त्याचे उत्तर देताना म्हणतात की, तो प्रकाश सूर्याचा नव्हता, तो सूर्य नव्हताच मुळी ते तर शिवराय होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,
असे म्हणत हे इंग्रज शिवरायांना का डाकू म्हणतात त्याचे ही कारण अमर शेख पुढे सांगतात. ते म्हणतात, इंग्रजांनी शिवकाळात सुरतला पहिली वखार घातली होती.
तिथून त्यांनी दिल्लीवर नजर रोखली होती आणि ही हालचाल महाराजांच्या ध्यानी आली म्हणूनच राजांनी इंग्रजांना झोडपायचे ठरवले होते. अमर शेख म्हणतात,
हे शब्द लिहून जणू अमर शेख शिवरायांचे मनोदय स्पष्ट करतात. गुजराती लोकांना हात न लावता इंग्रज व मोगलांना झोडपा हा आदेश सांगतो की महाराजांनी सुरत लुटली पण गुजराती बांधवांना नाही लुटले.
अमर शेख ह्यांनी आपल्या शब्दांमधून त्याच काळात हे गैर समज दूर केले होते. इंग्रजांना असे झोडपल्यामुळेच त्यांनी आपला इतिहास चुकीचा सांगितला हे ह्यातून स्पष्ट होते. शाहीर अमर शेख नंतर शिवरायांच्या पूर्वजांचे वर्णन करतात आणि शहाजी राजांचे वर्णन करताना ते म्हणतात,
ह्यातून शिवरायांना स्वराज्य मंत्र देणारे शहाजी महाराज आहेत हेच अमर शेख सांगताय. शिवपूर्व काळातल्या महाराष्ट्राचे वर्णन करताना शाहीर म्हणतात की, जणू आई आणि मूल आडरानी अडकले आहे. त्यात जोराचा पाऊस व्हावा, वादळ सुटल्यामुळे जीव भयभीत व्हावा, तोच विजांचा कडकडाट व्हावा.
कुठून तरी वाघाच्या डरकाळीचा आवाज यावा आणि जीव फाटावा, वरून दगडांप्रमाणे गारांचा वर्षाव व्हावा, आश्रयासाठी एक गुहा दिसावी पण आत शिरताच डोंगर कोसळून खाली पडावा अशी काही अवस्था महाराष्ट्राची झाली होती. जी केवळ शिवरायांमुळे दूर झाली आणि महाराष्ट्र पुन्हा स्वतंत्र झाला.
शाहीर अमर शेख शिवरायांच्या मातापित्यांचे वर्णन करताना म्हणतात, जिजाऊंचे व शिवरायांचे कार्य गाताना ते म्हणतात,
महाराष्ट्राच्या इतिहासात शाहिरांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनी जसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डफावरच्या थापेने ती आग पेरली तशीच शिवाजी महाराजांची कीर्ती सुद्धा जनमनात रुजवली.
शाहिरांच्या या कार्यामुळेच महाराजांचा लढा आजही कोणत्याही लढ्याला बळ देत असतो. शाहीर अमर शेखांना, त्यांच्या कलेला आणि अस्मिता, अभिमान जागृत करणाऱ्या त्यांच्या काव्याला आणि मनाचा मुजरा!